कणकवली,दि.०१ ऑगस्ट
महाराष्ट्र शासनाच्या ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत कोंडये, ता. कणकवली यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आदिशक्ती अभियानात ग्रामपंचायत कोंडये विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून उत्कृष्ट कामगिरी केली. या कार्याची दखल घेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांकाचा सन्मान प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच ऋतुराज तेंडुलकर , उपसरपंच रवी तेली,सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच अभियानाच्या यशात योगदान देणाऱ्या सर्वांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या यशामुळे ग्रामपंचायत कोंडयेच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला.