मुंबई, दि.०३ जुन
गिरणी कामगार घराचा प्रश्न असेल किंवा बंद एनटीसी गिरण्यांचा प्रश्न असेल,त्याच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले जाईल,अशी ग्वाही,राष्ट्रीय मिल मजूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्या त बोलताना दिली.गोविंदराव मोहिते यांच्या ७७ व्या वाढदिव सा निमित्त,त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी परळ येथील स्व.गं.द.आंबेकर सभागृह(तळमजला)येथे सन्मान सोहळा पार पडला.कार्यक्रमाला माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यापूर्वी खंडाळा येथे पार पडलेल्या प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते गोविंदराव मोहिते यांचा गुणगौरव करण्यात आला.
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर १६ गिरणी कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीच्या वतीने जो यशस्वी लढा उभा करण्यात आला आहे,त्याच्या पाठपुराव्यात गोविंदराव मोहिते यांनी घेतलेले परिश्रम तसेच बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली जी आंदोलने छेडण्यात आली,त्यामध्येही गोविंदराव मोहिते यांचे कार्य विशेष लक्षणीय ठरले आहे, असे याप्रसंगी अनेक नेत्यांनी सांगितले.खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघूनाथ (अण्णा) शिर्सेकर, बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे,आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे, संघटन सेक्रेटरी सुरेश मोरे आदींची त्यावेळी भाषणे झाली.