ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल; आयुक्त रुबल अगरवाल व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतली माहिती
दोडामार्ग,दि.४ सप्टेंबर
दोडामार्ग तालुक्यातील मौजे सासोली गावातील सामाहिक जमीन संदर्भात सासोली गावातील काही ग्रामस्थ शेतकरी यांनी जमीन खरेदी तसेच रस्ते, काढणे जंगल तोड, खरेदी बाबत चूकीची माहिती याबाबत महसूल विभागाच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. संबंधित अधिकारी दखल घेत नाही चौकशी करत नाही कार्यवाही होत नाही याबाबत तक्रारी केल्या होत्या. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी याची दखल घेऊन महसूल मंत्री यांचे लक्ष वेधले होते. शिवाय कोकण विभागीय आयुक्त कडे पाहणी संदर्भात मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल तसेच जिल्हाधिकारी समवेत सासोली गावातील सामाहिक जमीन मध्ये भेट देऊन पाहणी केली.

सासोली गावातील ग्रामस्थ तसेच कंपनी दरम्यान गेल्या तीन चार वर्षापासून जमीन खरेदी वरून वाद विवाद सुरू आहेत. उपोषण आंदोलन देखील झाली सनद रद्द करावी अशी मागणी केली. पण महसूल विभाग तसेच सरकार कडून दखल घेतली जात नाही असा आरोप केला जात होता.
सासोली गावातील ग्रामस्थ यांनी जमीन दिली नाही तरी जमीन खरेदी दाखवून कर्ज उचल केली.
लोकांनी जमीन दिली नाही तेथे रस्ते काढले हजारो झाडे विनापरवाना तोडली असे अनेक आरोप केले होते. तर ओरजीन कंपनीकडून आपण सर्व कागदपत्रे कायदेशीर तसेच लोकांच्या परवानगीने जमीन खरेदी केली असा दावा केला होता.

शुक्रवारी दुपारी सासोली गावातील ग्रामस्थ यांना कोकण विभागीय आयुक्त भेट देणार हे समजाताच सासोली गावातील ग्रामस्थ सासोली सडा येथे दाखल झाले. यावेळी दाखल झालेल्या आयुक्त रुबल अगरवाल यांनी सोबत जिल्हाधिकारी, तहसीलदार वन क्षेञपाल, यांच्या समवेत सासोली गावातील सामाहिक जमीन मध्ये इतर गाडया जावू शकत नाही यामुळे थार जीप घेऊन पाहणी केली. यावेळी सासोली गावातील मनोज गवस, विजय ठाकूर, आयुक्त रुबल अगरवाल यांनी या दौऱ्याबाबत काही अधिकारी यांना अनभिज्ञ ठेवून थेट सासोली जंगलात जाऊन रस्ते, वृक्षतोड बाबत पाहणी केली.
काही ग्रामस्थ याना तुम्हाला येथे डेव्हलपमेंट पाहिजे की नको असा सवाल केला यावेळी विकासाला विरोध नाही पण जंगलतोड करून कापून विकास नको अशी भूमिका मांडली.